याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारनं साडेसहा लाख घरे मंजूर केली होती. मात्र यात वाढही करण्यात आली आहे. या योजनेतून १३ लाख घरं मंजूर करण्यात आलंय. तसंच यावर्षी गरिबांसाठी २० लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केलीय. देशाच्या इतिहासात कोणत्याच राज्याला एका वर्षात इतकी घरे मिळालेली नाहीत. मोदी सरकारनं महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे’. असं मुख्यमंत्री म्हणाले.

आतापर्यंत या योजनेसाठी २६ लाख अर्ज आले होते. उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ. तसंच पूर्वी जे काही निकष होते, ते देखील सौम्य करण्यात आले आहेत. जे बेघर आहेत, शेतकरी असो किंवा महिला, अशा सर्वांना नव्या सर्वेक्षणात सामावून घेण्यात येणार आहे. तसंच निकषांनुसार ज्यांना खरंच गरज आहे, त्यांनाच घर देण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे पुढील ५ वर्षात बेघर लोकांना घरं देण्याचं संकल्प मोदी सरकारनं केला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानतो’. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले

लोकप्रिय योजना